माजलगाव । वार्ताहर
केरोनाच्या पार्श्वभूमीवर हातावर पोट असणार्‍या गोरगरीब जनतेचे आधार म्हणून रा.स्व.संघ संचलित जनकल्याण समितीच्या वतीने तालुक्यातील 25 कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप आणि दररोज 40 जणांना डबे पुरविण्याचे काम कार्यकर्ते निस्वार्थपणे करत आहेत.माजलगाव शहरातील कालिंकानगर भागात मंगळवारी गरजूंना अन्नधान्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी रा.स्व.संघ जनकल्याण समितीचे जिल्हाध्यक्ष डॉ.किशोर रत्नपारखी, तालुकाध्यक्ष  गोरख मेंडके, तालुका कार्यवाह कमलाकर जोशी, राहुल खुर्पे, जिल्हा कार्यकर्ते उपस्थित होते. आजवर समितीच्या वतीने जवळपास 25 गरजू कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप करण्यात आले. तसेच दररोज 40 जणांना मोफत जेवण्याच्या डब्यांची सोय जनकल्याण समितीच्या कार्यकर्त्यांची टीम करत आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.