औरंगाबाद । वार्ताहर

मागील सहा महिन्यापासून न्यायमंदिरे बंद असल्याने ज्युनिअर वकीलावर उपासमारीची वेळ आली आहे. आता मंदिराच्या बरोबरीने न्याय मंदिरेही सुरू करण्यात यावी, या मागणी साठी आज जिल्हा व सत्र न्यायालयासमोर तसेच ट्राफिक सिग्नलवर वकिलांनी आंदोलन केले.

 मार्च-2020 पासून अति  महत्वाचे प्रकरण वगळता कोरोनामुळे न्यायमंदिरे बंद करण्यात आली आहे. यामुळे वकीलावर उपासमारीची वेळ आली आहे. मंदिरे सुरू करण्याच्या हालचाली सुरू असताना आता वकिलांनी देखील न्यायमंदिरे सुरू करण्यात यावी, अशी मागणी करत महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल विरोधात रास्ता रोको आंदोलन केले. बार कौन्सिल कडून देण्यात आलेले अन्नधान्याचे किटची मदतही तुटपुंजी आहे. वकिलांना इतर व्यवसाय करता येत नसल्याने वकिलांना उदरनिर्वाह करणे अवघड झाले, परिणामी वकील आत्महत्या सारखा पर्याय निवडतील त्यामुळे लवकरात लवकर न्यायमंदिरे सुरू करावी, अशी मागणी यावेळी वकिलांनी केली आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.