जालना । वार्ताहर

जालना येथील राज्य राखीव पोलीस दलातील सत्यांशी जवानांचे अहवाल प्रयोग शाळेकडून निगेटिव्ह प्राप्त झाले असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. जालना येथील राज्य राखीव दलातील जवान काही दिवसांपूर्वी मुंबई येथे बंदोबस्तासाठी गेले होते. जवळपास 97 जवानांचा समावेश असलेली सदर तुकडी जालना येथे परतली होती.

सध्या मुंबई येथे कोरोनाच्या आजाराने पाच हजारच्या जवळपास लोकांना बाधा झाली असून या पार्श्‍वभूमीवर जालना येथे बंदोबस्त करून परतलेल्या जवानांपैकी 10 जवानांवर जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले असून उर्वरीत 87 जवानांच्या लाळेचे नमुने घेऊन जिल्हा रुग्णालयाने ते नमुने प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठवले होते. याबाबतचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्यामुळे सरकारी यंत्रणेतील अधिकारी, कर्मचार्‍यासह नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.