घनसावंगी । वार्ताहर
माजी मंत्री तथा आ. बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राहुल भैय्या लोणीकर यांच्या नेतृत्वात घनसावंगी येथे अतिवृष्टी व चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा या मागणीचे नायब तहसीलदार गौरव खैरनार व मंडळ अधिकारी काळे यांना भाजपच्या वतीने निवेदन देण्यात आले.या निवेदनात अतिवृष्टी व चक्रीवादळामुळे शेतकर्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. शेतकर्यांनी हंगामात घेतली जाणारी ऊस,मोसंबी, केळी,सोयाबीन,बाजरी,तुर, मका आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या अतिवृष्टी व चक्रीवादळामुळे ऊस पीक पूर्णपणे पडले आहे.
केळी, मोसंबी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे कापुस पिकाचे ङ्गुलपाते व दोड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून उत्पादनावर त्याचा परिणाम दिसून येणार आहे परिणामी या हंगामातील घेतलेल्या ऊस, केळी,मोसंबी,सोयाबीन, बाजरी,तूर,मका पिकाचे अतोनात नुकसान झाले असून अत्यल्प होणार आहे त्यामुळे घनसावंगी तालुक्यात अतिवृष्टी व चक्रीवादळामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकर्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा यावेळी निवेदन देताना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ह.भ.प रमेश महाराज वाघ,माजी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय तौर,भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अ.जा. सर्जेराव दादा जाधव,भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अंकुशराव बोबडे,भाजप किसान जिल्हा सरचिटणीस कैलास शेळके,भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गोविंद ढेंबरे,भास्करराव पांढरे,सुरेश पोटे,एकनाथ महाराज राठोड,सुरेशराव उगले,योगेश ढोणे,अर्जुन माळोदे,भाऊसाहेब देवडे,अमोल काळे,विलास चव्हाण,अमोल निर्मळ,अनिल जाधव,हरिभाऊ पाटोळे,सचिन पाटोळे,कैलास लांडगे,सुनील शेंडगे,राम भालेराव,सुनील गुढेकर,विशाल साबळे,बाबासाहेब वायाळ,प्रकाश रंधवे सह भाजप कार्यकर्ते उपस्थित भाजप होते.
Leave a comment