जिल्हाधिकारी यांच्याकडे समस्त वारकरी संप्रदायाच्या करण्यात आली
जालना । वार्ताहर
संत जगद्गुगुरु तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर माऊली तसेच राजे संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, या महानसंत व महापुरुष यांच्या नावाने बिडीचे कारखाने उभारून त्यांच्या नावाने उत्पादन तयार करून विक्री करणारया कारखानदारावर कार्यवाही करून गुन्हा दाखल करण्याची मागणी जालना जिल्ह्यातील समस्त वारकरी संप्रदायाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या महानसंतानी व महापुरुषानी महाराष्ट्रा सह संपूर्ण देशात व्यसन मुक्ती तसेच देश भक्ती करून सर्व सामाजाला परमार्थाचा मार्ग दाखविणार्या थोर संताच्या नावाने बिडीचे कारखाने कडून विक्री करून समस्त वारकरी यांच्या भावना दुखविल्या आहेत, त्या बिडी कारखानदारावर योग्य कार्यवाही करावी,संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्याचा हि इशारा या निवेदना द्वारे करण्यात आला आहे या निवेदना वर सर्वस्वी हभप सुखदेव म. गोरे, सतीश म. जाधव (शास्त्री) निवृत्ती म. लकडे, किशोर म. जिगे, गणेश म. कोल्हे, सोपान म. जैतापूरकर, दतात्रय म. वाघ, चिंभळेकर महाराज, भगवान म. साबळे, अनिल म. व्यवहारे, नंदकिशोर म. शहाणे, संजय म.कातकाडे, यांच्या स्वाक्षर्या आहेत.
Leave a comment