बदनापूर । वार्ताहर
तालुक्यात मागिल पंधरवड्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे भरपुर नुकसान झाले असून शासनाने लवकरात लवकर प्रति हेक्टरी पचंविस हजार रुपये मदत द्यावी व तालुक्यातील खतांचा काळाबाजार थांबवुन प्रशासनाने आपल्या कर्मचार्याच्या उपस्थितीत खत वाटप करण्यात यावे नसता 20 जुलै रोजी तहसिल कार्यालय व कृषी कार्यालया ला कुलुप लावण्या येईल या मागणीचे निवेदन तहसीलदार छाया पवार सादर करण्यात आले यावेळी छावा क्रातीविर सेना शेतकरी आघाडी चे पंकज जर्हाड , गणेश कोल्हे,शिवनाथ कोल्हे, अर्जुन पठाडे, गणेश नन्नवरे, राम मडके,शरद खडके, यादी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
Leave a comment