जिल्ह्यात 156 केंद्रांवर 42 हजार 464 विद्यार्थी देणार परीक्षा
कॉपीचे गैरप्रकार रोखण्यासाठी सहा पथके तैनात
बीड । वार्ताहर
बारावीच्या परीक्षांना सुुरुवात झाल्यानंतर आता आज 1 मार्चपासून इयत्ता दहावीच्या परीक्षांना सुरुवात होत आहे. या परीक्षेची शिक्षण विभागाकडून सर्व तयारी पुर्ण करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात 156 केंद्रावर दहावीची परीक्षा होत असून या परीक्षेसाठी जिल्ह्यातील 42 हजार 464 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षेदरम्यान कॉपीचे गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण विभागाकडून 6 भरारी पथके तैनात करण्यात आली असल्याची माहिती शिक्षणाधिकारी नानाभाऊ हजारे यांनी लोकप्रश्नशी बोलताना दिली.
आज 1 मार्चपासून आगामी 26 मार्च पर्यंत दहावीची परीक्षा पार पडणार आहे. ही परीक्षा अत्यंत तणावमुक्त व पारदर्शक वातावरणात घेण्यासाठी परीक्षा मंडळाने सर्व उपाययोजना केल्या आहेत. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नये. परीक्षा काळात मोबाइलवर व्हायरल होणार्या चुकीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन शिक्षण मंडळाकडून करण्यात आलं लोकप्रश्न आहे.
भरारी पथकाची नेमणूक
इयत्ता दहावीच्या परीक्षेदरम्यान गैरप्रकार होण्याची शक्यता असते. त्या अनुषंगाने बीड जिल्ह्यात शिक्षण विभागाच्या वतीने 6 भरारी पथके नेमण्यात आली आहेत. परीक्षेदरम्यान काही अनुचित प्रकार केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. परीक्षेच्या कालावधीत शिक्षणाधिकारी (मा.) कार्यालयात नियंत्रक कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यात लोकप्रश्न 14 परीरक्षक कार्यालयेही निश्चित करण्यात आली आहेत.
Leave a comment