अखेर दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. त्यानंतर आता विद्यार्थ्यांना पुढील वर्षात म्हणजे 11 वीमध्ये प्रवेश घेण्याकडे वेध लागले आहे. तर 11 वी साठी सेट परीक्षा  शनिवारी  21 ऑगस्ट रोजी होणार आहे. ही परीक्षा ऑफलाईन असणार आहे. तसंच, परीक्षा देणं ऐच्छिक असणार आहे.

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता अकरावीच्या प्रवेशाबाबत  एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. अकरावीच्या  प्रवेशासाठी CET) म्हणजेच प्रवेश परीक्षा घेण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली होती होती. त्यानुसार आता राज्याच्या शिक्षण विभागाकडून अकरावी प्रवेशाच्या CET परीक्षेबाबतची माहिती देण्यात आली आहे.

त्या अनुषंगाने २०२१-२२ च्या इयत्ता ११ वी प्रवेशासंदर्भात सामाईक प्रवेश परीक्षेचे आयोजन मंडळामार्फत शनिवार २१ ऑगस्ट, २०२१ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १.०० या कालावधीत करण्यात येणार आहे.

 

सीईटीची परीक्षा परीक्षा ही राज्य मंडळाअंतर्गत असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील २०२१-२२ मधील ११ वी प्रवेशासाठी असून ती विद्यार्थ्यासाठी पूर्णतः ऐच्छिक स्वरुपाची आहे. परीक्षा ही ऑफलाईन स्वरुपाची असून ती महाराष्ट्र बोर्डाच्या (मंडळाच्या) अभ्यासक्रमावर आधारीत असेल. प्रश्‍नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची (Multiple Choice Objective type Questions) व OMR वर आधारीत असेल. या परीक्षेसाठी राज्य मंडळ अथवा अन्य मंडळाच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (१०वी) परीक्षेमध्ये उत्तीर्ण/प्रविष्ट झालेल्या इच्छूक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या https://cet.mh-scc.ac.in या संकेतस्थळावरुन अर्ज भरणे आवश्यक आहे. अर्ज भरण्याची सुविधा मंडळामार्फत २०/०७/२०२१ रोजी सकाळी ११.३० पासून २६/०७/२०२१ अखेर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. अर्ज भरण्यासंदर्भात तसेच सामाईक प्रवेश परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांसाठी अधिक सूचना मंडळाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. याबाबत विद्यार्थी आणि पालकांना बोर्डाकडून कळविण्यात आले आहे.

 

अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया कशी असेल?

 

>> अकरावीची प्रवेशासाठी CET परीक्षा

>> इयत्ता 11 वी प्रवेशासाठी वैकल्पिक (Optional) CET परीक्षा

>> प्रवेश परीक्षेत राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न

>> गुण – 100

>> बहुपर्यायी प्रश्न

>> परीक्षा OMR पद्धतीने

>> परीक्षेसाठी दोन तासांचा कालावधी

>> कॉलेजमध्ये प्रवेशाचे निकष काय?

>> CET परीक्षेच्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार महाविद्यालयांमध्ये प्रवेश

>> CET परीक्षा देणाऱ्यांना 11 वी प्रवेशप्रक्रियेत प्राधान्य

>> त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश

>> CET परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन इयत्ता 10 वीच्या पद्धतीनुसार

दहावीचा निकाल 99.95 टक्के

यंदा इयत्ता दहावीचा निकाल 99.95 टक्के लागला आहे. तर यामध्ये तब्बल 957 विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 टक्के गुण मिळाले आहेत. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी 5 टक्के जास्त विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. तर 83 हजार 962 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. यंदाही कोकण विभागाचा निकाल 100 टक्के लागला आहे. कोकणात 31 हजार 168 विद्यार्थ्यांपैकी सर्वच विद्यार्थी परीक्षेत पास झाले आहेत. त्यामुळे विभागाचा निकाल 100 टक्के लागला आहे. तर सर्वाधिक कमी निकाल नागपूर विभागाचा म्हणजे 99.84 टक्के लागला आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थीनींचा निकाल 99.96% असून विद्यार्थ्यांचा निकाल 99.94% आहे. म्हणजेच विद्यार्थीनींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यांपेक्षा 0.02% ने जास्त आहे.दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 97.84% लागला आहे.

यावर्षी दहावीच्या निकालावर एक नजर

100 टक्के घेणारे 957 विद्यार्थी
राज्यात 100 टक्के घेणारे 957 विद्यार्थी आहेत
90 टक्के पेक्षा जास्त गुण घेणारे 1,04,633 विद्यार्थी आहेत
85 ते 90 टक्के दरम्यान गुण घेणारे 1,28,174 विद्यार्थी आहेत
80 ते 95 टक्के दरम्यान गुण घेणारे 1,85,542 विद्यार्थी आहेत

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.