बीड । वार्ताहर
दिवसेंदिवस वाढतच असणारे प्रदूषण,भरमसाठ झाडांची कत्तल आदी बाबीं मुळे पृथ्वीवर अनेक संकटे येत आहेत, यातच सध्या कोरोना विषाणू मुळे जग त्रस्त झाले आहे. आज 22 एप्रिल जागतिक वसुंधरा दिन असल्याने या वसुंधरेला रांगोळीच्या माध्यमातून वंदन करत पर्यावरण राखण्याचा व कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घरातच राहून नियमांचे पालन करण्याचा संदेश मुलींनी दिला आहे. संस्कार भारती बीड शाखेच्या वतीने वसुंधरा दिनाचे औ सन्सचित्य साधून दरवर्षी कार्यक्रम आयोजित करून वसुंधरेला अभिवादन करण्यात येते व पर्यावरण राखण्याचा संदेश दिला जातो. मात्र यंदा कोरोनाचा पार्श्वभूमीवर आपल्याला घरीच रांगोळीच्या माध्यमातून हा संदेश देण्याचे आवाहन करण्यात आले होते.
वाढते प्रदूषण आणि अयोग्य जीवनशैली हेच पृथ्वीच्या सद्य:स्थितीमागील मुख्य कारण आहे. आपल्या एकुलत्या एका पृथ्वीचे संरक्षण करण्याच्या प्रत्येकाच्या जबाबदारीचे स्मरण करून देणे हेच जागतिक वसुंधरा दिनाचे मुख्य उदिद्ष्ट आहे. आहे. हवा, पाणी, जंगले यांसारख्या
पृथ्वीवरच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा भसाभस अविचारी वापर केल्याने आणि वाढत्या प्रदुषणाचे परिणाम दिसतच आहेत आणि हे असेच चालू राहिले तर मानवाचेच भविष्य अंध:कारमय आहे हे निश्चित! याबाबत प्रबोधन करण्यासाठी 22 एप्रिल हा वसुंधरा दिन मानला जाऊ लागला. हाच संदेश मृणाल कुलकर्णी, मृण्मयी पुसरेकर, आर्या गजरे, वेदिका कुलकर्णी, मिताली कुलकर्णी, स्वराली सर्वज्ञ,पद्मजा सर्वज्ञ,सिद्धी कुलकर्णी या मुलींनी अतिशय सुंदर अशी रांगोळी सोशल डिस्टन्स पाळत काढली व एक सुंदर असा संदेश दिला आहे. या मुलीचे सर्वत्र कौतुक होत आहे, लॉकडाऊनच्या या परीस्थित सामाजिक संदेश त्यांनी दिला आहे.
Leave a comment