आष्टी तालुक्यातील भैरवनाथ यात्रा उत्सव रद्द
आष्टी : प्रतिनिधी
तालुक्यातील सर्वाधिक मोठी यात्रा समजल्या जाणार्‍या वाळुंज येथील भैरवनाथ यात्रा उत्सवात दरवर्षी हजारोच्या संख्येने भाविक दाखल होत असतात. कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने सर्वच धार्मिक यात्रा, उत्सव, कार्यक्रम यावर रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.त्यामुळे रविवार दि.१२ एप्रिल रोजी होणारा भैरवनाथ यात्रा उत्सव रद्द करण्याचा निर्णय वाळुंज ग्रामस्थांनी शनिवारी घेतला.

कोरोना विषाणूमुळे जगभरात घबराट निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात ही सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. कोरोनाचा परिणाम या यात्रा उत्सवांवर ही होऊ लागला आहे.सर्वच धार्मिक स्थळे मस्जिद,मंदिर,बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.या पार्श्वभूमीवर यात्रा उत्सव रद्द करण्याचा निर्णय वाळुंज ग्रामस्थांनी घेतला आहे.वाळुंज येथील यात्रा उत्सवात २५० वर्षाची परंपरा आहे. हा यात्रा उत्सव रविवार दि.१२ एप्रिल पासुन सुरू होणार होता वाळुज परिसरातील १० ते १२ गावातील पालखीची मिरवणूक या यात्रा उत्सवामध्ये सहभागी होत असते,शेजारच्या गावासह गावातील ग्रामस्थ नौकरी,व्यवसाय,व्यापार,उद्योग,कामासाठी गेलेले पुणे,मुंबई,पनवेल,नगर,औरंगाबाद,नाशिकसह महाराष्ट्र भरातुन दर्शनासाठी भाविक हजारोंच्या संख्येने दाखल होत असतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढु नये म्हणून यात्राउत्सव रद्द करण्यात आला आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.