बीड | वार्ताहर

 

 राजकारणात भूमीका फार महत्त्वाची असते यापूर्वी सुद्धा आम्ही कधीही भूमिका सोडली नाही. शरद पवार साहेबांचा आशीर्वादामुळेच मी आमदार निवडून आलो  पक्षाची पुरोगामी विचाराची जी भूमिका आहे, ती घेऊनच लोक आपल्याला स्वीकारत असतात. मला जिल्हाध्यक्षपदी संधी दिली तेव्हा लोकांनी मला खूप मान दिला. मला लोक डोक्यावर का घेतात, एक दिवसात माझी लोकप्रियता का वाढली तर ही पवार साहेबांची जादू आहे.

आपल्याला सोडून गेलेल्याना आता जिल्ह्यातील जनता त्यांची जागा दाखवून देतील. काही नेते काय हातवारे करून भाषणे करत होते.  साहेबांचा नाद करायचा नाही म्हणायचे, पण आता जे सोडून गेले त्यांना लोक स्वीकारणार नाहीत.  मी शेवटच्या श्वासापर्यंत शरद पवार साहेब तुमच्या पायाशी राहणार असे सांगत आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले,,बीड जिल्ह्यातील जनता स्वाभिमानी आहे येथील जनता पवार साहेबांना साथ देईल असा विश्वास आमदार संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला. 

बीड येथे 17 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वाभिमान महासभेचे आयोजन करण्यात आले आहे.खासदार शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत. या सभेला बीड जिल्ह्याचा कानाकोपऱ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरातील पारस नगरी येथे सभा सुरू आहे. 

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.