गेवराई तालुक्यातील भोजगाव येथील मन सुन्न करणारी घटना

 

धोंडराई | वार्ताहर

 

तालुक्यातील भोजगाव येथे निकीता संत (१८) या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी (दि.२४) ही घटना घडली, तिने आत्महत्या कोणत्या कारणाने केली हे मात्र अस्पष्ट आहे. दरम्यान अमृता नदीवरील पुल गेल्या अनेक वर्षांपासून वाहुन गेलेला आहे त्यामुळे नातेवाईकांना मृतदेह खांद्यावर उचलून शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जाण्याची वेळ आली. 

 

 

सदरील घटनेची माहिती मिळताच गेवराई ठाण्याचे बीट जमादार सतिष खरात यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी उमापुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला.

 

 

दरम्यान अमृता नदीवरील पुल वाहुन गेलेले काही वर्ष लोटले आहेत.परिणामी भोजगावातील नागरिकांना सूख दुःखाच्या वेळी अशी कसरत करावी लागत आहे. घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे मात्र याची जाण लोकप्रतिनिधी आणि बांधकाम विभागाला येईल का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.