मुंबई । वार्ताहर

लॉकडाऊन संपताच थकीत बिलांच्या वसुलीसाठी महावितरणे उद्यापासून वसुली मोहिम राबविण्याचे आदेश अधिकार्‍यांना दिले आहेत. 
कोरोनामुळे पहिल्या ल़ॉकडाऊनवेळी वीज बिलांची माफी देण्याची आश्वासने आल्याने अव्वाच्या सव्वा आलेली बिले लोकांनी भरली नव्हती. मात्र, तो लॉकडाऊन संपताच महावितरणने मोठी वसुली मोहिम हाती घेतली आहे. यापूर्वी  लॉकडाऊनमध्ये लाखो लोकांचे रोजगार बुडाले होते. या काळात अव्वाच्या सव्वा बिले पाठवून होती. त्यातच सत्ताधार्‍यांनी वीज बिलमाफीची पुडी सोडल्याने लोकांनीही बिले भरण्यास टाळाटाळ केली होती. महावितरणने अचानक वसुली सुरु करताच लोकांचाही रोष कर्मचार्‍यांना सहन करावा लागत होता. वसुली करण्यासाठी कधी वीज मीटर बंद तर कधी डीपीच बंद करण्यात आले होते. 
आता पुन्हा उद्यापासून वसुली सुरु केली जाणार असून  दुसर्‍या लॉकडाऊनमध्येदेखील ग्राहकांनी बिले भरली नाहीएत. महावितरणची गेल्या वर्षीपासून मे 2021 पर्यंत 6334 कोटींची बिले थकलेली आहेत. 2020-20 मधील 4099 कोटी, एप्रिल 2021 मध्ये 849 कोटी आणि मे 2021 मध्ये 1386 कोटी रुपये थकीत आहेत. वीज निर्मिती आणि कर्जावरील व्याजाच्या बोजामुळे महावितरण संकटात सापडली असून वीज बिलांची वसुली गरजेची असल्याचे अधिकार्‍यांना सांगण्यात आले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.